एका गावात एक शेतकरी आपल्या पत्नीबरोबर रहात होता. त्यांना एक लहान मुलगा होता. ते त्याच्यावर खूप प्रेम करायचे आणि त्याला खेळताना बघून आनंदी व्हायचे. एके दिवशी तो शेतकरी जवळच्या जंगलात एक छोटे मुंगूस पकडतो व त्याला घरी घेऊन येतो व आपल्या पत्नीला दाखवतो व बोलतो, ‘हा मुंगूस अतिशय लहान आहे व याला मोठे व्हायला आणखी सहा महिने लागतील. हा आपल्या मुलाचा चांगला जोडीदार बनू शकतो याला आपण पाळू शकतो.’ शेतकऱ्याची पत्नी या गोष्टीला तयार होते आणि मुंगूसाचे पण संगोपन करते. एकदा शेतकऱ्याची पत्नी बाजारात काही भाज्या घ्यायला जात होती. तिचा मुलगा पाळण्यात गाढ झोपलेला होता तेव्हा ती तिच्या नवऱ्याला बोलविते आणि सांगते, ‘मी बाजारात जात आहे व आपला मुलगा झोपलेला आहे तर त्याच्यावर लक्ष असू दया व मुंगूसाला त्याच्याजवळ जाऊ देऊ नका.’ शेतकरी म्हणाला, ‘काळजी करू नकोस आपला मुंगूस त्याला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचवणार नाही.’ शेतकरी, पत्नी येण्याची बराच वेळ वाट बघतो परंतु तिला परत यायला बराच उशीर लागतो. त्यामुळे तो त्याच्या कामासाठी निघून जातो. काही वेळानंतर शेतकऱ्याची पत्नी आपल्या झोपडीत परत येते. तो मुंगूस दाराच्या उंबरठयावर तिची वाट बघत होता. त्याचे तोंड रक्ताने माखलेले होते ते बघून तिला असे वाटले की, मुंगूस आपल्या मुलाबरोबर एकटा होता व त्याने आपल्या मुलाला नक्कीच मारून टाकले. ती रडायला लागली व म्हणाली, ‘तू माझ्या मुलाला मारलेस!’ आणि एक जड वस्तु त्याच्या डोक्यावर मारून फेकते व ती आत जाते. ©Ajay #walkalone गोष्ट