धक्का बसल्यावर कसे वाटते बरं, काळजावर नवीन घाव गेल्यावर कसे वाटते बरं, माझ्या रागाचे कारण खरे तर हेच आहेत, एकदा पण विचार नाही करत ती कसा कासावीस होतोय जीव त्याचा काय त्रास होतोय त्याला कधी जाणून पण घेतले नाही तिने कधीच, मी माझ्या आयुष्यात कुणाकडे कुणावर अवलंबून राहत नाही पहिली गोष्ट आणि त्यात तिच्यावर मी कधीच जास्त अपेक्षा नाही ठेवल्या, ठेवल्या नाहीत असा भाग नाही ठेवल्या पण ज्या योग्य होत्या काही दृष्टीत ज्या देऊ शकेल ती, त्याने बस विश्वास आणि प्रामाणिक पणा निदान तरी कमी झाला नसता ना, आणि जे काही घडलं ते घडले नसते ना,चुकीचा नाही समजत मी तिला करतेय काही ती योग्य असेल निदान सांगू तर शकते ना ती मला तिथे विश्वास अजून वाढला असता तिच्या वर हे तिला भान नव्हते हक्क नाही माझा काही ठिकाणी पण तिला विचारू शकत नाही हे माझे दुरभाग्यच असणार ना, प्रत्येक ठिकाणी विश्वास महत्वाचा असतो प्रेमात तर असायला पाहिजे नाहीतर त्या नात्यात काही रस उतरत नाहीत, मला विचारू नकोस काही निर्णय पण दूर जाण्या आधी निदान एकदा सांगू शकत होतीस ती पण तिला त्या गोष्टी योग्य वाटल्या नाहीत, मनाने नव्हे तर डोक्याने वागलीस ती माझ्या प्रेमात, त्रास काय असतो काळजी काय असते जीव कसा असतो कधी भेटून बघ म्हणा एकदा त्या व्यक्तीला ज्याने कधी स्वतःचा विचार नाही केला. -AS Patil✍️ बस तिची बाजू नील आणि चुका तो कायम सावरत बसला, स्वत: तुटून तो बस तिच्या मनात जागा शोधत बसला, काय भेटले प्रेमात त्याला एक क्षण पण तो सुखाने जगला नसेल स्वार्थी नव्हता तो कधी म्हणून योग्य वेळ योग्य दिशा तो कायम सांगत बसला, त्याचे पूर्ण जीवन त्याने तिच्या साठी दिले पण ती एक वेळ पण त्याचा विचार न करता त्याला साथ नाही देऊ शकली,