ध्येयाकडे वाटचाल करता करता पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या प्रवासाच्या वाटेत शोधत राहतो. पण काही उत्तर भविष्यात जशी असतात तशी ती भूतकाळात देखील राहून गेलेली असतात. त्यांचा मागोवा घेणं देखील तितकंच गरजेचं असतं. काही उत्तर आपल्या आजूबाजूलाच असतात पण स्वप्नांना गाठण्याची धडपड आपल्याला आजूबाजूला पाहण्याचं कष्ट देखील घेऊन देत नाही. त्यामुळे कधी अडीअडचणीला अनुत्तरित प्रश्नांनाच्या गदारोळ्यात अडकलाच तर 'घालीन लोटांगण' म्हणत सभोवताल धुंडाळायचा जेणेकरून प्रशांची उकल होईल.