पानगळ होऊन जेव्हा, नवी पालवी फुटते झटकून सारे ग्लान, झाड पुन्हा बहरात येते मरगळ अंगची गाळून घेते मुळासकट अन् पुन्हा मूळापासून हिरवे होण्यासाठीच झटते शिशिराच्या थंडीमध्ये जरी कातडी ऊलते तशातही झाड खंबीरपणे तग धरून टिकते घट्ट पाय रोवून वा-यालाही परतवून लावते तेव्हा हे झाड उत्तुंग हिमालयासारखे वाटते पाने फुटता वाटसरूस ते शितल छाया देते पशू पक्षांचे निवास बनून अंगाखांदी झुलवते मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकदा नव्यानं आशेचे धुमारे फुटतात. मानवी स्वभावाचं ही असंच आहे, नाही का? चला तर मग, नव्या उमेदीने आज लिहुया. वेदनांना मागे ठेवून नवी आशा पल्लवित करूया. पुढील कविता पूर्ण करा. टॅग करा #पालवी #YQtaai #collab