ज्ञान नाही, विद्या नाही वंगाळ वाचा, असते नेहमी तयास मानव म्हणावे का? माणूस आहे, माणुसकीधर्म नाही पशु नव्हे, पशुसारखे कृत्य नेहमी तयास मानव म्हणावे का ? बुद्धी आहे, विचार नाही वागणे तयाचे, अविचारी नेहमी तयास मानव म्हणावे का? हात दोन, पसरते नेहमी कमावण्याची, जिद्द नाही तयास मानव म्हणावे का? राजकरणापाई, भविष्य अंधारात अख्खी जवानी, तळवे चाटण्यात तयास मानव म्हणावे का? मित्रानों💕 आज माननीय सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपल्या नायगांव या गावाविषयावरील त्यांची कविता अप्रतिम आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केला. चला तर मग आज त्यांच्या प्रसिद्ध कवितेच्या शिर्षकावरुन तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. लिहीणार ना? खरं तर हा विषय बघताचं माझ्या डोक्यात तर खुप कल्पना आल्यात,मी तर लिहीणार आहे लगेच. तुम्ह