चाळीशीच्या उंबरठ्यावर आलोय हे आता जाणवू लागले, वाचन करताना जेव्हा अक्षरे अंधुक दिसू लागली नि डोळ्यातून पाणी येऊ लागले. मन काही मानायला तयार नाही, चाळीशीच्या उंबरठ्यावर आलोय म्हणजे म्हातारे झाले,हे काही बरोबर नाही. आता कुठे मुलांना समज येऊ लागली आहे, आई वडिलांच्या मेहनतीची त्यांना जाण होऊ लागली आहे. त्यांचं राहू द्या आपल्या आई बाबांना ही बघा त्यांच्यासाठी आपण अजूनही लहान आहोत, आणि लोकं म्हणे आपण चाळीशीच्या उंबरठ्यावर आलो आहोत म्हणजे म्हातारे झालो आहोत. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे.