कधी कधी जोंधळ्याच्या शेतातील वेङ्या पाखरांकडे बघतांना आयुष्याचा भास होतो..." बहुतांशी पाखरं अपयशाच्या बुजगावण्यांना घाबरून संधीच्या शेतात उतरतच नाहीत... आणि वावरातील बुजगांवणी खोटी आहेत हे कळेपर्यंत संधीचा हुरडा संपून, पीकांची मळणी झालेली असते... पंखात धग आणि चोचीत रग असेपर्यंत बुजगावण्यांना घाबरायचे काम नाही आणि हे दोन्ही संपल्यावर जगण्यात काही अर्थ नाही...!! संधी ओळखा आणि वेळीच संधीच सोनं करा