नसावे कुणीही असे जीवनात ज्याला तुम्हांला तोडावे लागेल भेट होऊ नये अश्यांची.. ज्यांना कधी गमवावे लागेल काही माणसे का येतात आयुष्यात? ज्यांना आपण ओळखत नसतो. उगाच त्यांना आपल्या मनात नकळत घर करू देतो. रंग त्यांचे कळतात जेव्हा खूप उशीर झालेला असतो.. दोष कोणचा असतो? त्यांना आसरा दिला म्हणून आपला? कि त्यांनी आपली तमा न ठेवली म्हणून त्यांना? काही कळत नाही ह्यातून एक वाईट प्रवृत्ती जन्माला येते.. आपण जे नसतो ते आपल्याला बनावे लागते. जे मनाला पटत नाही नेमके तेच करावे लागते. कुणाचे आपल्या आयुष्यात येणे हे आपण नाही ठरवू शकत ना?.. पण आपण नुसते चांगले बनून राहणे पण योग्य नाही. ज्याने कोणी आपला फक्त फायदा घेईल.