सायंकाळी कातरवेळी दिली घेतली वचने सारी कुजबुजलेले अलगद कानी आकाशाला कळले नाही कधी अधर तर नेत्र कधी ते सारे काही सांगत होते शब्दावाचुन कळे भावना नको बोलणे आता काही प्रेमाने तू कवेत घेता गोड शहारा उठतो अंगी हवेहवेसे वाटू लागे स्पर्श गुलाबी दोघांनाही भाव मुके पण स्पर्श बोलके प्रीत आपली पाहे रजनी एकरूप ते झालो आपण द्वैत न आता उरले काही पडता लोभस असे चांदणे खुले खळी तव गालावरती लुकलुकती त्या किती तारका चंद्र नभीचा तुलाच पाही नको दुरावा दोघांमध्ये तुझे न माझे नुरे वेगळे अखंड राहो अशीच सोबत नसे मागणे अजून काही उमा जोशी १८/०२/२०२१ ©उमाच्या मनातलं #गोदातीर्थ #वनहरिणी