खोडलेल्या बोलक्या ओळी...दै.स्वतंत्र भारत स्वतःसाठी कधी प्रेम पत्र लिहिली नाही. पण खूप मित्राना प्रेम पत्र लिहून दिली. साले गच्ची धरून पत्र लिहून घ्यायचे.तू लई झ्याक लिहितो म्हणायचे. माझ्या अवांतर वाचनाचा हा प्रभाव असेल. उपमा,प्रतिमा,अलंकार तेव्हा काही कळत नव्हतं. कौतुक केलं की या गोष्टी ओघाने येतात. आपल्यातला कवी ,लेखक नकळत त्या वयात घडत होता. हे आता कळतंय मात्र. माझं भाषिक कौशल्य प्रेमपत्रातूनच विकसित झालं. प्रेमपत्र लिहिणे ही काही साधीसोपी गोष्ट नाही. त्यालाही दांडगा अभ्यास लागतो. खो