०१]*बोधकथा* एका शेतकऱ्याकडे दहा आंबे असतात. तो आंबे एका डालीत पिकविण्यासाठी ठेवतो. त्या दहा आंब्यांपैकी एक आंबा खराब झालेला असतो. खराब झालेला एक आंबा बाकी नऊ ही आंब्याना खराब करण्याचा प्रयत्न करतो. मग हे शेतकऱ्याने वेळीच पाहिलेले असते. तो खराब झालेला आंबा शेतकरी फेकुन देतो. त्या आंब्याला नऊ आंब्यापासुन शेतकरी समंजस पणे वेगळे करतो. जर शेतकऱ्याने त्या खराब आंब्याला लवकर डालीतुन काढले नसते तर पूर्ण आंबे खराब झाले असते. *तात्पर्य:- वाईट संगतीत राहु नका ,संगत चांगल्याशी करा. वाईट लोकांना वेळीच ओळखा आणि त्यांच्यापासुन दुर रहा.* कवी.शंकर सुतार वरवडे, जिल्हा:-सोलापूर. मो.क्र. ९८८१३५५३१७. ©कवी.शंकर सुतार 🙏🕉 बोधकथा