काय करावे काय करू नये ह्या विचारांसाठी, जन्म मानवाचा विचारांच्या गुंत्यासाठी. जन्मता मानव अनेक नाती जुळतात, कुठे जिवलग तर कुठे नावापुरताच राहतात. प्रश्न हा नेहमीच,जन्म मानवाचा नक्की कशासाठी, हसत आयुष्य जगण्यासाठी की दुःख कुरवाळत बसण्यासाठी. सत्कर्मात राहावे नेहमी,नेहमी चांगले विचार करावे, कसेही वागण्यापूर्वी मानव जन्म मिळाला ह्याचे भान ठेवावे. फक्त मनुष्य म्हणून जन्म होतो मानवाचा, समाज त्यास नाव देतो मग जात धर्माचा. जन्म मानवाचा हा फक्त नावापुरता असतो, कर्मातूनी मानव स्वतःची ओळख घडवत असतो. पाहता जनावरांस सर्वांना हेच वाटत असते, बरे जन्म मानवाचा मिळाले,नाहीतर काय झाले असते. शेवटी काय तर जन्म मानवाचा मिळाला कशासाठी,हे जाणून घ्यावे, मानव म्हणून जन्मलात तर मानवासारखेच वागत राहावे. नमसकार मित्रहो, कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील आजचा विषय आहे...जन्म मानवाचा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर १० ते १६ ओळींची कविता लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा #yqkavyanand हा हॅश टॅग अवश्य ठेवा.