भावना अनावर झाल्या की भावना कागदावर उतरतात.. आज सकाळीच "प्रसन्न सकाळ" असा सुंदर विषय दिला आणि दुपारी लगेच मन दुखावणारी पोस्ट शेअर केली. YQ ताई तुम्ही your quote बंद होणार ही पोस्ट टाकली आणि कित्येकांचे मन दुखावले गेले. आणि आता संध्याकाळी विषय ही तसाच "भावना अनावर झाल्या की".. खरंच भावना कागदावर उतरतात जेव्हा अनावर होतात.. Yq बंद होणार ही बातमी मला कालच @manishadongrekulkarni ह्यांच्या कडून समजली होती.. तेव्हाच खूप वाईट वाटले.. पण मला वाटलं कदाचित बातमी खोटी असू शकते.. कारण एखादी चांगली गोष्ट जेव्हा प्रसिद्धीस जाते तेव्हा त्या गोष्टी बद्दल नको नको त्या अफवा पसरवल्या जातात.. मला ही हा त्यातलाच एक प्रकार वाटला म्हणून मी दुर्लक्ष केले पण आता तुम्ही ही पोस्ट जाहीर केली आणि भावना अनावर होऊन तुमच्या समोर हे लिहावे वाटले गेले काही दिवस कामाच्या व्यापामुळे माझे लेखन थोडे कमी झाले होते पण आज ही पोस्ट वाचली आणि खूप वाईट वाटले.. ह्यावर पुढील महिन्या भरात काही तोडगा निघून हा निर्णय बदलला गेला तर खूप आनंद होईल.. शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे भावना अनावर झाल्या कि भावना कागदावर उतरतात... #भावनाअनावर चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine