महापुर रक्ताचे पाणी करून उभा केलेला संसार, एकाच क्षणात उध्वस्त झाला. ध्यानी मनी नसताना, भयंकर महापुर आला. गाई - गुरे सर्व काही, पाऊस स्वतःसोबत घेऊन गेला. कर्ज घेऊन वाढवलेल्या पिकाची, नासाडी करुन गेला. साचलेल्या पाण्यामुळे रोगराईने, हाहाकार केला. व त्यातच हा महापुर अनेकांचे, जीवन संपवुन गेला. आणि हा महापुर जाता जाता राजकारणी लोकांना भांडायला, एक विषय देऊन गेला. ©Mrunalini Mandlik महापुर कोल्हापूर जिल्ह्यात मागिल वर्षी आलेल्या महापुरावर आधारित ही कविता.