हे भारत माते जागी हो...... जागी हो भारत माते जागी हो स्वातंत्र्यदेवते कित्येक सुपुत्र तू जन्माला घातले होतेस आज या क्षणी त्यांचीच उणीव भासते गुलामगिरीच्या जोखडातून मुक्तता करून हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवराय तूच जन्माला घातला होतास पूर्वी एकच सूर्याजी जन्मला,आज पावलो गणिक सूर्याची दिसत आहेत खिंडीला पावन करणारा बाजीप्रभू तू जन्माला घातलास पण आज तुलाच खिंडार पाडणारे पुत्र जन्मले आहेत ते हाती धरतात फक्त वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे पण नाही आठवत त्यांना स्वातंत्र्य देवतेला मुक्त करून हसत-हसत फासावर जाणारे मंगल पांडे नाही आठवत त्यांना शिका संघटित व्हा संघर्ष करा असा मंत्र देणार आंबेडकर नाही आठवत त्यांना स्वातंत्र्य मातेला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करणारे सावरकर दुसऱ्याच्या मांसाचे लचके तोडणाऱ्या गिधाडांच्या तृप्त ओठावर नाही उमटत मायेचे पाझर असत्य मेव जयते हे ज्यांनी ब्रीदवाक्य मानलय त्यांना नाही जमणार अहिंसा .नाही बोलता येणार सत्य अत्याचाराचे तांडव करणाऱ्या कौरवासाठी तू पांडव निर्माण केलेस आज गरज आहे अशा पांडवांची एक तरी पांडव निर्माण कर तेव्हाच त्या लक्षावधी कौरवांचे तांडव संपेल तुझ्याच पोटी जन्मल्या होत्या जौहार करणाऱ्या त्या रजपूत भार्या पण आज सगळीकडे पसरला आहे व्यभिचाराचा दर्या तुफानागत तू जन्माला घातले रामदास ज्ञानेश्वर तुकाराम यासारखे संत पण आज सगळीकडे अशांत अस्थिरता अशा वेळी तुला का नाही जाग येत शपथ तुला या मातीची... जागी हो भारत माते.... जागी हो स्वातंत्र्य देवते आमच्यासाठी.... आम्हा सर्वांसाठी ...उद्याच्या भारतासाठी ,.............राजाराम कंटे जुनी सय नवं वलय