Nojoto: Largest Storytelling Platform

*ते कोल्हापूर गाव कुठे गेले*।

*ते कोल्हापूर गाव कुठे गेले*।                                       दुःखात नांदणारे , आज ते रंक अन् राव कुठे गेले।           नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले|।          राधानगरी तालुका असे, देणगी ही निसर्गाची|।               महालक्ष्मी हे देवस्थान , रुपे दिसेही स्वर्गाची।             वाट वळणाची , दाटी वनाची, सारे हे ‘ प्रभाव ' कुठे गेले        नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले|।         राधानगरी धरणादुरी, दिसे जागा बरी, तिथे घरे बांधिली पूरग्रस्त होता, जीवन कंठिता , सुखे ही शोधिली।             मॄत्यूचे थैमान , होई बेभान, कैक देहांची झाली माती।      बायको, मुले, बहिण - भाऊ मायेची तुटली अतूट नाती।     कंठ दाटूनी , धीर सुटला , काळजाचे हे घाव कुठे गेले।   नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले ।        बघता बघता निसर्ग कोपला, निसर्गाचा आंधळा धड़ा।    होत्याचे नव्हते झाले, ढळता ढळता डोंगरकडा।            गांव हे शोधता , दुःख हे भोगता देहाचे ठांव कुठे गेले       नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले|।         ‘आदित्य  ’करतो प्रार्थना , हे मेघराजा घे विसावा फार झाले , सुकलेल्या माळराणी , ज्या ठिकाणी दुष्काळाचे वार झाले।                                                                                     ✍🏻- *आदित्य सिताराम पारखे।         विक्रोळी पार्क साईट  मुंबई*
*ते कोल्हापूर गाव कुठे गेले*।                                       दुःखात नांदणारे , आज ते रंक अन् राव कुठे गेले।           नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले|।          राधानगरी तालुका असे, देणगी ही निसर्गाची|।               महालक्ष्मी हे देवस्थान , रुपे दिसेही स्वर्गाची।             वाट वळणाची , दाटी वनाची, सारे हे ‘ प्रभाव ' कुठे गेले        नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले|।         राधानगरी धरणादुरी, दिसे जागा बरी, तिथे घरे बांधिली पूरग्रस्त होता, जीवन कंठिता , सुखे ही शोधिली।             मॄत्यूचे थैमान , होई बेभान, कैक देहांची झाली माती।      बायको, मुले, बहिण - भाऊ मायेची तुटली अतूट नाती।     कंठ दाटूनी , धीर सुटला , काळजाचे हे घाव कुठे गेले।   नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले ।        बघता बघता निसर्ग कोपला, निसर्गाचा आंधळा धड़ा।    होत्याचे नव्हते झाले, ढळता ढळता डोंगरकडा।            गांव हे शोधता , दुःख हे भोगता देहाचे ठांव कुठे गेले       नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले|।         ‘आदित्य  ’करतो प्रार्थना , हे मेघराजा घे विसावा फार झाले , सुकलेल्या माळराणी , ज्या ठिकाणी दुष्काळाचे वार झाले।                                                                                     ✍🏻- *आदित्य सिताराम पारखे।         विक्रोळी पार्क साईट  मुंबई*