यात आपण काय करायचं? आयुष्यात, सर्वांची मनं सांभाळणं खूप कठीण काम असतं एकट्याला ते पटत असतं दुसऱ्याला ते पटत नसतं यात आपण काय करायचं असतं? आयुष्यात, सगळे चांगलच सांगतात मग त्यांचा ऐकायचं, की स्वतःचं स्वतःचं मन तोडायचं की त्यांचं मन मोडायचं यात आपण काय करायचं? दृष्टिकोन सर्वांचे वेगळे असतात विचार सर्वांचे वेगळे असतात पण सगळेच आपले असतात यात कुणाच ऐकायचं? यात आपण काय करायचं? यात आपण काय करायचं?