प्रत्येक कविता माझी जखमी कविता वाटू लागली, जेव्हा पासून तू न सांगताच माझे हृदय तोडून गेली. आज ही तसेच लिहीत आहे जसे पहिले लिहीत असायचो, एकांतात बसून तुझ्या आठवणीत रमून राहायचो. खूप गोड होत्या तेव्हा त्या कविता नुसते त्यात प्रेम असायचे, तू गेल्यापासून लिहितोय त्यात सर्वांना विरह दिसायचे. माझा काय ह्यात दोष मी फक्त मनातले भाव उतरवायचो, लिहिताना कविता फक्त तुझ्या आठवणींना कागदावर उतरवायचो. लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असतात प्रेम कविता,मैत्री कविता इत्यादी आज जखमी कविता लिहा. आजचा विषय आहे प्रत्येक कविता माझी जखमी...