"निळी नाती आणि आपली माणसं" लहान पणीपासून अगदी आतापर्यंत नशिबानं जी माणसं मिळाली ती फार जिव्हाळी लागली पण ती कधीच आपल्यासाठी थांबलेली नाही. त्यांच्या नशिबाचा रस्ता सर करता करता आता ती खुप दूर गेलेली आह. पण लहान होतो तेव्हा याची जाणीवच कधी झाली नाही त्यांच्या सोबत दिवस घालवण्यात एवढा रमलो की ते कधीतरी आपल्याला सोडून कुठे तरी दूर निघून जाईल हेही कधी समजलं नाही कधी केव्हा ते कधी भेटतात पण आजकाल त्यांच्याकडे सुद्धा वेळ उरलेला नाही सतत जो तो आपापल्या अभ्यासात, कार्यात व्यस्त आहे. पण जे सुख मी त्यांच्या सोबत भोगलं ते कधी विसरलो नाही आणि ते विसरण्याची ईच्छा सुद्धा नाही ती आठवण मरेपर्यंत नक्कीच राहील यात तिळमात्र शंका नाही. पण त्यातून हे समजलं की आज जी माणसं आपल्याबरोबर आहे त्यांच्यासोबत आयुष्य आनंदीत जगत राहायच. - ऋतिक लक्ष्मण जिड्डेवार (R.J) निळी नाती आपली माणसं