परीक्षेचा पेपर आणि एक्साईटमेंट (लेख👇) "क्या पेपर आया था यार ! पर पुरा नहीं हुआ, सर ने पेपरही खिंच लिया" पेपरनंतर फारच मज्जेशीर असतात मुलांचे संवाद..पेपरचा गठ्ठा वर्गापासून एक्जाम रुमपर्यंत नेईपर्यंत गंमत येते विद्यार्थ्यांचे संवाद ऐकताना , तर कधी रागही येतो. प्रश्नपत्रिका हातात आली की वर्गात डिस्कस केलेले प्रश्न आले तर मुलांचा हुरुप वाढतो.त्यांचा हा हुरुप फार काळ टिकत नाही.पेपर लिहिताना इकडे तिकडे पहायचं किंवा होईल ना पेपर हा अतिआत्मविश्वास , अतिउत्साहीपणा घात करतो.अन् मग हातचे गुण एक्जामिनरच्या झोळीत जातात. आपल्या सोबतही असंच होतं.