फक्त विचार... न रातीला झोप कधी नीट नाही येत, सतत काळजी कुणाची मणी जिवाची कालवा-कालव होत असे सतत, कसे कोणी एवढा जीव गुंतवून बसत असेल बरं रोज विचार असे, अनेक प्रश्न मणी असा थैमान घालत आतूनच स्वतःला तोडत असतात, समोरच्या व्यक्तीचा एवढा विचार एवढी काळजी एवढं प्रेम जर ती व्यक्ती या गोष्टी नीट समजत असती तर एवढा त्रास कधीच झाला नसता, समजत नाहीये म्हणून हा त्रास होतोय कारण पहिली गोष्ट ऐकत नाहीस अन जरी कधी ऐकले तर नीट समजून घेत नाहिस, गैरसमज राग भांडण हे पण गरजेचं असतं त्या शिवाय कळंत नाही कोण आपलं आहेत आणि कुणाला आपली गरज किती आहेत, प्रेम किती अन काळजी किती, जीव कुणात हे फक्त काही गोष्टी मुळेच समजत... स्वतःच काहीच नाहीये याची खंत मनात कायम असती माझे सर्व आहेत जे मी जपून आहेत पण मी कुणाचा नाही आता गरज ही संपलीय माझी असं वाटतंय या घडीला,विचार तर सगळ्यांचा केला जेव्हा वेळ माझी आली हक्क माझा आला हात फिरून पाठ दाखवून निघून गेलेत बरेच जिवाची माणसं पण परत नाही गेलेल्या लोकांचा विचार नाही केला परत आणि जरी कोणी परतलं असेल तर त्यांना परत नाही, एकदा तुटला तो तुटतोचं मग, फक्त ज्यांनी परिस्थिती मुळे सोडलंय तेच येतात जवळ, म्हणून अजूनही काही असे आहेत त्यांची जागा ती कोणीच नाही भरू शकत, पण वेळ आहेत योग्य येत