आठवणी बालपणीच्या.. अजून त्या वाटेवरती आलो कि, आठवतात ते क्षण.. विसरून जाते सारे आणी डोळ्यासमोर आठवते ते फक्त बालपण.. कुणाचा नाही सांगा ,काढला नाही इथे बाप भांडणे सोडवताना सराचा व्हायचा मनस्ताप. हातावरी बसायची मग काटी सपासप. थोड्यावेळात सगळी पोरं गप्प. दंगेखोर, अशा अनेक तक्रार आलेल्या घरी मग बाबांची तर वेगळीच असायची स्वारी गटात गटाची असायची आमची इथे यारी सगळे एकत्र आलो कि पडायचो सर्वांना भारी. हुशार मुलांचा वेगळाच इथे ऐट संपर्क त्यांचा सरांशी थेट. जरी तो आला शाळेत लेट तरी त्याचा मामला व्हायचा सेट. कला काही येत असेल सादर करा हा सरांचा अट्टहास आम्ही त्यामध्ये होतो खास. कवितेला चाली लावणे हा आमचा नवीनध्यास कला इ मध्ये आमचा सहभाग हमखास. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. आयुष्याची खरी मज्जा तर असते आपल्या बालपणी. शाळेमध्ये गेल्यावर आज ही आठवतात त्या जुन्या आठवणी. मित्र, मैत्रिणी ची आणी शिक्षकांमधिल दे दिवस आठवतात त्या क्षणी. कवी -कु सचिन सदाशिव झंजे. आठवणी ह्या बालपणीच्या....