Find the Latest Status about चांगलं होतं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चांगलं होतं.
gauri kulkarni
#चांगलं_वागण्याचं_काम कधी कधी सूर्य आणि चंद्र एकाचवेळी आकाशात असतात. एकजण आपलं कार्य संपवून परतीच्या प्रवासात असतो , तर दुसरा आपलं कार्यस्थळ गाठण्यासाठी लगबगीने निघालेला असतो. माणसांचंही असंच होतं ना? काही माणसं आपल्या आयुष्यात एक छानसं काम आयुष्यभर करण्यासाठी येतात. मग ते छोटंसं काम का असेना. पण त्यांच्या क्षणभराच्या पाउलखुणाही आपल्याला सुरेख अनुभव देत राहतात. जशी चांगली माणसं येतात तशी वाईटही येतातच. वाईट माणसं आपल्याला कसं वागू नये हेच शिकवत असतात त्यांच्या कृतीतून. पण आपण दुःखात इतके मश्गुल होतो की ते लक्षातच येत नाही आपल्या. आता कुणी म्हणेल काय तत्वज्ञान आहे हे?? पण तसंच तर असतं नीट विचार केला की समजतं चांगलं वागणं हा जसा आपला गुण आहे तसं वाईट वागणं हा त्यांचा. मग ते त्यांचं काम जर इमानेइतबारे करत आहेत तर आपण का नाही करायचं. ज्याला त्याला कामाचा मोबदला ईश्वर देतोच की त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. आज दुःख आहे तर उद्या सुख येण्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत. आणि त्यासाठी चांगलं वागण्याचं काम करणं गरजेचं आहे. थोडंसं अवघड आहे पण ट्राय तर करून बघा. प्रत्येकाला आज एक तरी छोटासा इच्छापूर्तीचा क्षण मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु. #गौरीहर्षल #चांगलं वागण्याचं काम
#चांगलं वागण्याचं काम #गौरीहर्षल #चांगलं_वागण्याचं_काम
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
प्रेम खरं असलं की मनातलं ओठावर येतं.. मन खरं असलं की ओठातलं शब्दावर येतं.. शब्द खरं असलं की शब्दरूप पानावर येत पानरुपी शब्दांच रूपांतर माझ्या कवितेत होतं.. मन लावून वाचलं की वाचलेलं हृदयात जातं... हृद्य चांगल असलं की कवितेला समजून घेतं.. समजून घेताना शब्दांना चांगला अर्थ देतं.. का कुणास ठाऊक हे सगळं आपसूक होतं... ©गोरक्ष अशोक उंबरकर सगळ आपसूक होतं..
सगळ आपसूक होतं.. #मराठीकविता
read moreकवी - के. गणेश
आयुष्याचं असं होतं.. वाहून गेलेल्या पाण्यासारखं वय कसं निघून जातं.. जगून घेईन म्हणत म्हणत आयुष्य किनाऱ्याला येतं.. चुरगाळलेल्या फुलासारख्या भावना विरून जातात.. मागे वळून पाहताना डोळेही भरून येतात.. ऋतुपरत्वे झाडाची पानं गळू लागतात.. ऊन वाऱ्याच्या झळा आपसूक कळू लागतात.. भूतकाळाकडं बोट करून रडताही येत नाही.. अन् चुकलेलं गणित खोडताही येत नाही.. पार शेवटच्या वळणावर जाणीव खोल होते.. जणू ओस माळरानात बहरायची सल राहते.. @kganesh ९०२८११०५०९ आयुष्याचं असं होतं..
आयुष्याचं असं होतं..
read moreकवी - के. गणेश
जीव असा गुंततो की डोकंही बधीर होतं.. तरल भावनांच्या पाई मनही अधीर होतं..! @kganesh मन अधीर होतं..
मन अधीर होतं..
read moreSecret Quotes
प्रॆमात काही मर्यादा असतात अन त्या जर तुमच्या जवळच्या व्यक्ती ने तोडली तर त्या वेळेस होणाऱ्या त्रासा ला कोणी जाणवलं आहेत का...? त्या नंतर काय करायला हवं या वर कॊणी समजून घेताय का...? चूक समोरच्या जीवलगा ची नसते...? तिथे आपला विश्वास अन आपला प्रामाणिक पणा नडत असतो.. मग त्या व्यक्तीला त्याची शिक्षा देऊन काय अर्थ आपण चूक करतोय ना, जास्त विश्वास ठेवून,, तर ती शिक्षा स्वतःच घेतली पाहिजे निदान समोरच्या व्यक्तीला त्या चुकीची अन विश्वासाची जाणीव तर होईल... शेवटी जाता जाता...! नातं विश्वासच होतं शेवटी......
नातं विश्वासच होतं शेवटी......
read more